जळगाव (हतनूर धरण)दि. 16- जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हातनुर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहेत (वेळ- 10.10 मि.) धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर मुक्ताईनगर तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव,जामनेर, एरंडोल, धरणगाव,या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे.पुढील तासात हातनुर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे हतनुर धरणाची धोका पातळी 215 मीटर असून आज रोजी धरणाची पातळी 212 मीटरवर सुरू आहे तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे तसेच पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी त तत्पर आणि बाबत कळविन्यात आले आहे .
तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे