केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यालयांचा गौरव..

जळगाव – जिल्ह्याच्या प्रशासनाने केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यात आपले नाव उजळवले आहे. यासाठी जिल्ह्यातील 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले आहे. हे जळगावसाठी अभिमानास्पद आहे.”
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
खा. स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, रेल्वेचे भुसावळ विभागीय व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले.
जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव
केंद्र शासनाच्या विविध योजनांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 130 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये खालील विभागांचा समावेश होता:
आरोग्य, शिक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग:चोपडा, पारोळा, रावेर, अमळनेर, नशिराबाद, सरवटे, फाकरी आदी आरोग्य केंद्रांतील कर्मचारी महिला व बालविकास, जलसंधारण व ग्रामविकास विभाग बोदवड, शिरसोली, धरणगाव, यावल, केडर वाईस प्रकल्प रेल्वे, बँकिंग, दूरसंचार व महामार्ग विभाग भुसावळ रेल्वे, बीएसएनएल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
इतर योजनांतील अधिकारी:
प्रधानमंत्री आवास, स्वच्छ भारत, जल जीवन मिशन, लाईव्हस्टॉक मिशन, आदिवासी ग्रामविकास, अमृत स्टेशन योजना, ई-बस सेवा, ग्रामीण कौशल्य विकास, जीवन ज्योती अभियान आदी
जिल्हा परिषद, तहसील कार्यालये, पंचायत समित्या, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रकल्प मॉनिटरिंग युनिट, व इतर अनेक कार्यालयांतील कर्मचार्यांनी आपल्या कार्यातून जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना सर्वांनी बोलून दाखविली.