गुन्हेगारीजळगावजळगाव जिल्हा
चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !
जळगाव : प्रतिनिधी
तुम्हाला जास्त मस्ती आली का? म्हणत चौघांनी तीन भावंडांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास धानवड तांडा येथे घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली आहे.
धानवड तांडा येथील पालू जालम चव्हाण (वय २८) हा बुधवारी सायंकाळी गावात उभा होता. त्या ठिकाणी गावातील चार व्यक्ती तेथे आले. ‘थांब रे, तुला जास्त मस्ती आली का?’ असे म्हणत चौघांनी चव्हाण याला व त्याच्या दोघा भावांना मारहाण केली.