गुन्हेगारीजळगावजळगाव जिल्हा

चौघांनी केली तीन भावंडांना मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी
तुम्हाला जास्त मस्ती आली का? म्हणत चौघांनी तीन भावंडांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास धानवड तांडा येथे घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली आहे.

धानवड तांडा येथील पालू जालम चव्हाण (वय २८) हा बुधवारी सायंकाळी गावात उभा होता. त्या ठिकाणी गावातील चार व्यक्ती तेथे आले. ‘थांब रे, तुला जास्त मस्ती आली का?’ असे म्हणत चौघांनी चव्हाण याला व त्याच्या दोघा भावांना मारहाण केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे