कांचन नगर मध्ये न्याय केंद्राची स्थापना
जळगाव – शहरातील कांचन नगर आणि परिसरातील नागरिकांसाठी न्याय केंद्राची स्थापना दि. ३०सप्टेंबर रोजी स्व. बिंदूबाई सोनवणे सभागृहात करण्यात आली. अ. भा. अधिवक्ता परिषदेच्या जळगाव तालूका शाखेच्या वतीने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या प्रसंगी मुख्य अतिथी प्रल्हाद ठाकरे, डाॅ. मीनाक्षी पाटील, रघुनाथ सपकाळे, निर्मलबाई माळी, प्रविण झंवर इ.मान्यवर उपस्थित होते.
परिषदेचे जिल्हा महामंत्री एड. प्रदीप कुळकर्णी यांनी अधिवक्ता परिषदेच्या कार्याची व न्याय केंद्राच्या कामकाजाची थोडक्यात माहिती करून दिली. या प्रसंगी प्रास्ताविक एड.रमाकांत सोनवणे, एड. सुचेता हाडा, डाॅ. मिनाक्षी पाटील, रघुनाथ सपकाळे, पुंडलीक सपकाळे कानळदा सरपंच इ मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,तालुका अध्यक्ष एड. योगेश राजपूत यांनी व आभार प्रदर्शन एड. देवेंद्र विसावे, एड.शारदा सोनवणे यांनी केले.
या न्याय केंद्रात दर महिन्याला पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सायंकाळी ४ते ७ या वेळी तीन वकील मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील. कांचन नगर व परिसरातील नागरिकांनी या केंद्राचा उपयोग घ्यावा, असे आवाहन अधिवक्ता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली होती.