जळगाव

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे अनिल अडकमोल यांच्या तर्फे जळगावात जल्लोषात स्वागत..

जळगाव प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मंगळवारी रात्री दहा वाजता जळगावात आगमन झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी आकाशवाणी चौकात त्यांचे भव्य स्वागत केले. रामदास आठवले मंगळवारी खान्देश दौऱ्यावर होते, नियोजित दौऱ्यानुसार ते नंदुरबार येथून जळगावमार्गे भुसावळला जाणार होते.

मात्र त्यांचा भुसावळचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. रात्री दहा वाजून १० मिनिटांनी ते जळगावात दाखल झाले, अजिंठा शासकीय विश्रामगृहावर त्यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, भोजन केल्यानंतर रात्री पावणे बारा वाजता ते रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

समता नगरवासीयांनी दिले निवेदन….

दरम्यान, अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांना एक निवेदन सादर केले. समता नगर येथील ६५ एकर जागा रहिवाशांच्या नावे सातबारा उताऱ्यावर लावावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. १९८४ पासून या जागेवर तीन ते चार हजार घरे आहेत. प्रताप बनसोडे, भिमराव साळुंखे, मुनाफ खाटीक, साहेबराव सोनवणे, उज्ज्वला अडकमोल, मनिषा बाविस्कर, सुभाष भंडारकर, सचिन अडकमोल, किसन साळवे, कैलास बाविस्कर, शाम सोनवणे व आनंद गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे