यावल(प्रतिनिधी)- येथील बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या १८ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३१ मार्च शुक्रवारी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज पर्यंत उमेदवारी अर्ज यांची संख्या ४९ झाली आहे तर ३१ मार्च पर्यंत १६२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. शुक्रवारी उमेदवारांसह सूचक अनुमोदक व समर्थकांची गर्दी उसळली होती सोमवारी उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे यापूर्वी ०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्जांची संख्या ४९ झाली आहे. मतदार संघ निहाय उमेदवारी अर्ज दाखल झालेले असे विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ ३१ ग्रामपंचायत मतदार संघ १३ व्यापारी मतदार संघातील पाच असे एकूण ५० अर्ज दाखल झाली आहे तर हमाल व मापारी मतदार संघातून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही ही माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम.चव्हाण यांनी दिली आहे