दसनूर गावाजवळीजवळील रेल्वे बोगदयात पाणी साचल्याने शालेय विद्यार्थी व वाहनधारकांची होतेय गैरसोय
प्रतिनिधी बलवाडी– आशीष चौधरी
दसनूर बलवाडी रस्त्यावरील रेल्वे गेटला पर्यायी मार्ग म्हणून नवे बोगदे उभारण्यात आले असून तेथील बोगदयात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
दसनूर-बलवाडी या रस्त्यावर रेल्वे विभागा कडून रेल्वे गेटला पर्यायी मार्ग म्हणून हा बोगदा उभारण्यात आला होता.मात्र बोगदा उभारताना पाण्याचा निचरा करणारी योग्य उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोगदयात पावसाचे पाणी सतत साचून राहते.या समस्येमुळे शालेय विद्यार्थी, पादचारी आणि वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.आजुबाजुच्या गावातील शालेय विद्यार्थी,केळी व्यापारी,शेतकरी,शेतमजूर यासह प्रवाशी वाहने या रस्त्याने जा ये करतात.त्यामुळे वाहनांची वर्दळ सुरुच असते.लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही समस्या कायम असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी तातडीने पाहणी करून समस्या सोडविण्याची वाहनधारकांनी मागणी केली आहे.