जळगाव

शेतीपिक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ई KYC- करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

जळगाव – जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सन २०२२ पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार २ लाख १३ हजार ४१६ शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास २४४ कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.मात्र जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई – केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई – केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई – केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचीत आहेत.

विशेषत: माहे जानेवारी २०२४ ते माहे मे २०२४ या कालावधित जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा ,अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी ५ हजार ८५४ शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता आले नाही.

तरी संबंधित शेतकरी यांनी सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ई – केवायसी करावे व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे