यावल

शहरातील विस्तारीत भागातील रस्ते,गटारीची समस्या सोडवा, नगर पालिकेत निवेदनाव्दारे मागणी

यावल : शहरातील विस्तारीत भागातील काही भागात रस्ते, गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. पाऊस सुरू झाल्याने या भागात चिखल झाला आहे व आता ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षात वारंवार लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा नगरपालिकेने दखल घेत या भागातील समस्या सोडवल्या नाहीये तेव्हा आता तातळीने या समस्या सोडवल्या नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येइल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे

येथील नगर पालिकेत स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्या कडे विस्तारीत भागातील नागरीकांनी मोहंमद अशपाक शाह यांच्या नेतृत्वात निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की, विस्तारीत भाग हा प्रभाक क्रमांक ३ मध्ये येतो व या प्रभागातील गणपती नगर, आयेशानगर, तिरुपतीनगर, वासुदेवनगर, गंगानगर येथे रस्ते, गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाहीये यात आता पावसाळा सुरू झाला असुन पावसाच्या पाण्याने या भागात प्रचंड चिखल होत आहे. तेव्हा तिखल तुडवत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी आपण तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा येत्या १५ जुलै नगर पालिके समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे निवेदन देत प्रसंगी मोहम्मद अशपाक शहा गफ्फार शहा, शेख अयाजोद्दीन शेख शहाबोद्दीन, शेख नजीब शेख वाहेद, शेख दानिश शेख आसिफ, आमिर खान सुभान खान, शेख अनीस शेख हमीद, सद्दाम शहा रहेमान शहा, महेमुद खान हबीब खान, वसीम सिकंदर पटेल, हाबीज खान हाजी रऊफ खान सह आदींची उपस्थिती होती.-

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे