यावल

वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना..  

यावल – काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वार्‍यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना घडली आहे. तर या कुटुंबातील मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात वाचला आहे. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी येथे वादळात रात्री घर कोसळून चौघे जागीच ठार झाले आहेत.

यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील चौघांचे शव हे बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. घराचे छत अंगावर पडून गुदमरून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचाार सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे