जळगाव

पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया..

चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!!पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी

जळगाव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यभर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढली असून यात्रेचा समारोप येत्या 20 ऑगस्ट रोजी वेळ 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालय जवळ,मुंबईत होणार असून यावेळी पत्रकार,वृत्तपत्र,जेष्ठ पत्रकार,न्युज पोर्टल, युट्युब चॅनल,वृतपत्र विक्रेता यांच्या न्यायिक मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सरकारला निवेदन देण्यात येणार असून मागण्या मंजूर करण्यासाठी आग्रही असणार आहोत,म्हणूनच

दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहा, तुम्ही ….

आजवर आपण ऊन, वारा, पाऊस न पाहता दुसऱ्यांसाठी खूप वेळ दिला पण आता आपल्या हक्कासाठी वेळ देण्याची वेळ आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचे प्रश्न एवढ्या प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्यभरात *पत्रकार संवाद यात्रा* काढून पत्रकारांना एकजूट केले आहे. आता हीच ती वेळ… आपले हक्क मिळवून घेण्याची… चला तर मग एक दिवस स्वतःसाठी देऊया…!

(ज्या पत्रकार, ग्रामीण भागातील वार्ताहर, डिजिटल मीडिया पत्रकार यांना मुंबई यायचे असल्यास मो. 9021969100 या नंबर वर कॉल करा)

प्रविण सपकाळे, जळगाव राज्य कार्याध्यक्ष

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे