रावेर

रा.से.यो. स्वयंसेवकांनी समाजातील साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करणे :- प्राचार्य डॉ अनिल पाटील.

(रावेर -हमीद तडवी)

श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाच्या माध्यमातून आज 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस डी धापसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना मध्ये विद्यार्थ्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता स्वयंस्फूर्तीने व निस्वार्थपणे सहभागी व्हावे तसेच समाजातील गोर गरिबांची सेवा करण्याची इच्छा निर्माण करणे तसेच आपण स्वतःसाठी नसून इतरांसाठी आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येतो प्रत्येक स्वयंसेवकांनी थोडा वेळ मानव जातीच्या कल्याणासाठी दिला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती व प्रेरणा निर्माण करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे.

महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांनी मांडली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट प्रत्येक स्वयंसेवकांनी साध्य केले पाहिजे प्रत्येक रास स्वयंसेवकांनी ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला समजून घेणे स्वतःला व समाजाला समजून घेण्यासाठी पात्रता विकसित करणे समाजांच्या गरजांची माहिती करून घेणे अडचणी जाणून घेणे व ती सोडविण्यासाठी प्रयत्न करणे त्यामुळे समाज अधिक सक्रिय बनेल आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकी जाणीव निर्माण करणे आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत व सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी करणे समाजात मिसळण्यासाठी ज्या गुणाची गरज आहे ती गुण अंगीकारणे तसेच नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणे समाजातील गोरगरीब वर्गांची सेवा करण्याची इच्छा निर्माण करणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप हे दोन प्रकारे त्यांनी छान पद्धतीने मांडले एक नियमित व विशेष हिवाळी शिबिर यामध्ये 200 विद्यार्थ्यांपैकी शंभर विद्यार्थी हे शिबिरासाठी निवडले जातात.

या शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता वृक्षरोपण सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांना उद्बोधन करणे तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीभ्रूण हत्या अशा संवेदनशील विषयाची जनजागृती स्वयंसेवकांनी करावी तसेच नियमित मध्ये वैद्यकीय तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन वृक्षरोपण अशा विविध उपक्रमाचे माध्यमातून समाजाची व राष्ट्राची सेवा करावी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नीता जाधव राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी यांनी आपल्या प्रभावशाली वकृत्वातून केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ संतोष बी गव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस डी धापसे सर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ एस बी गव्हाड महिला कार्यक्रमाधिकारी डॉ नीता जाधव अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ स्वाती राजकुंडल वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सागर महाजन प्रा विकी राऊत तसेच मोठ्या व उत्स्फूर्त संख्येने अशा राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक विद्यार्थी आदींची उपस्थिती दिसून आली

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे