रक्षाबंधन निमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सैनिक बांधवांना राख्या रवाना
जळगाव -अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षाप्रमाणे आपले कर्तव्य मानून नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे 500 राख्या पाठविण्यात आल्या या भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव तर्फे पाठवण्यात आल्या.
याप्रसंगी माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड ,सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, नितीन पाटील ,रतिलाल महाजन. हे उपस्थित होते .या राख्या सीमा वरती भागात असलेल्या सैनिक बांधवांसाठी लेहलद्दाख, तवांग, सिक्कीम, नभुला पास, पुंछ सेक्टर,तंगधार इत्यादी ठिकाणी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालय यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील, नेहा जगताप ,विजया पांडे, नीता वानखेडकर उपस्थित होत्या.