सावदा

पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा केळी उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी

बलवाड़ी प्रतिनिधी -आशीष चौधरी

सावदा – केळीचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय हा फक्त विश्वासअर्थेवर अवलंबून असून अनेक व्यापारी विश्वासाचा फायदा घेत शेतकऱ्यांची फसवणूक करीत असतात व यात केळी उत्पादक शेतकरी बळी पडत असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत असते शेतकऱ्यांचे फसवणूक होऊ नये व ज्या व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी सावदा परिसरातील शेतकरी किशोर पाटील अनिल महाजन वाघोदा श्याम पाटील सावदा कमलाकर पाटील पंकज पाटील कोचुर या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे चर्चा केली सावदा येथील शेतकरी शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची देखील भेट घेऊन त्यांच्याकडे व्यथा मांडले आहेत

केळी हे नाशिवंत फळ असल्याने परिपक्व झाल्यावर मिळेल त्या भावात व मिळेल त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांना कापणी करून द्यावी लागत असते या संधीचा अनेक फसवे व्यापारी फायदा घेत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे कोट्यावधी रुपये अडकले आहेत या व्यापाऱ्यांमध्ये काही व्यापारी पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश बिहार या भागातील असल्याने कारवाई करणे अवघड असते त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शिष्टमंडळाने केले आहे यावेळी जिल्हाधिकारी यांनी या शिष्टमंडळाची जवळपास अर्धा तास चर्चा केली चर्चेदरम्यान यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून लवकरच नवीन सिस्टीम तयार करण्यात येईल व लवकरच सावदा येथे व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्यात येतील असे शेतकऱ्यांना सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे