रावेर

शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, “कही खुशी, कही गम” अशी परिस्थिती 

दसनुर प्रतिनिधि :- पुरुषोत्तम संगपाळ 

शुक्रवारी दसनुर , निंभोरा, मस्कावद,वाघोदा, तांदलवाडी रात्रीपासूनच परिसरात शनिवारीही संततधार पाऊस झाल्याने काही पिकांसाठी पाऊस समाधानकारक असला तरी शनिवारी दुपारी झालेल्या हलक्या हवेमुळे सावखेडा परिसरातील काही शेतकऱ्यांची मका,केळी बागांची खोडे उन्मळून पडली. म्हणून शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे “कही खुशी, कभी गम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही पिकांना या पावसाचा फायदा असला तरी काही पिकांना नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.  आधीच शेतकरी राजा विविध संकटांना सामोरा जात असून त्यामध्ये गारपीट ,वादळी वारे ,सी एम व्ही, असे विविध संकटे आहेत. असे विविध संकट आले तरी शेतकरी परत कसातरी उभा राहतो व पुन्हा नैसर्गिक आपत्ती येते व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आलेला आहे.

त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरच देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.सीएमव्हीं चे पंचनामे झालेल्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची नावे नाहीत. तरी ज्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांची नावे कुठे गहाळ झाली, हा एक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये बोलला जात आहे.. तरी शासनाने यावर काहीतरी तोडगा काढून ज्यांचे सीएमव्हीचे पंचनामे झालेले आहेत, त्यांनाही नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फोटो- शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी खोडे अशी उन्मळून पडली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे