अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बलवाडी गाव झाले भगवेमय..
बलवाड़ी प्रतिनिधी -आशीष चौधरी
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बलवाडी गावातील रस्ते भगवे रंगाचे पताका लावून सजवण्यात आले. तसेच महादेव मंदिर, राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर सजले होते.मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून भगवे ध्वज,पताका लावून सजवले होते. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दुपारी १ वाजेपासून ६ वाजेपार्यत महादेव मंदिराजवळुन दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी सोहळ्यात प्रभू श्री. राम, माता सीता, प्रभू श्री. लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा बालगोपालानी प्रदान केली होती. दिंडी सोहळ्यात महिलानी भगवे रंगाच्या साड्या व पुरुषांनी भगवे रंगाच्या टोप्या तर लहान बालगोपालानी भगवे रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी जय श्री राम, बजरंग बली की जय असे जयघोष करण्यात आले.
दिंडी सोहळयात भजने, डीजे यावरती गावातील ग्रामस्थ व महिलानीमंडळींनी पावले व नाचत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजी करत मोठ्या रोमहर्षक वातावरणात प्रभु श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्सवात पार पडला. दिंडी सोहळया नंतर हनुमान चालीसा व रामरक्षा स्तोत्र सायंकाळी ६ वा. आयोजन कारण्यात आले होते. दिंडी सोहळयात महाप्रसादाचे आयोजनही केले. या वेळी गावमध्ये नवचैतन्याचे वातावरण होते. या दिंडी सोहळयात महिला, लहान मुले पुरुष, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.