डिबीटी अंतर्गत अडचणींचे निवारण करा अविनाश पाटील यांच्याकडे चर्चेद्वारे स्थानिक शेतकऱ्यांची मागणी..
जळगाव – केंद्र शासनांतर्गत जलसंधारण, सिंचन यासह सर्वसामान्यांसाठी घरकुल, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान, सौर कृषी पंप, ठिबक अनुदान, रेशन अन्नधान्य यासह विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यासंदर्भात जळगाव येथील विजया केसरी प्रतिष्ठानचे संचालक तथा युवा उद्योजक अविनाश पाटील यांनी केंद्र स्तरावरून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना लाभ व अडचणी संदर्भात संवाद साधला. दरम्यान, वडनगरी, आव्हाणे येथील स्थानिक शेतकऱ्यांनी डिबीटी अंतर्गत अडचणींचे निवारण करण्याची मागणी अविनाश पाटील यांच्याकडे चर्चेद्वारे केली.
किसान लाभासह अन्य योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी
गेल्या ९/१० वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कडून सर्वसामान्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यात अल्पभूधारक व पात्र शेतकऱ्यांसाठी समान तीन हप्त्यात दोन हजार रुपये प्रमाणे वार्षिक ६ हजार रुपये शेतकरी सन्मान लाभ संबंधितांच्या थेट बँक खात्यात दिला जात आहे. परंतु काही पात्र लाभार्थी
शेतकऱ्यांना ७ व्या हप्त्यापासून तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित आहेत. यासंदर्भात शासन (लोकप्रतिनिधी) प्रशासनाने तांत्रिक अडचणींचे निवारण करावे, अशी मागणी वडनगरी, आव्हाणे ग्रामस्थ शेतकऱ्यांनी युवा उद्योजक अविनाश पाटील यांचेकडे चर्चेदरम्यान केली.
कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाचा अभाव
केंद्र शासनाच्या अनेक योजना कृषी विभागाशी संबंधित आहेत. परंतु बरेचसे शेतकरी कृषी अधिकारी वा संबंधित कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधला असता योग्य मार्गदर्शन केेले जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी चर्चेदरम्यान मांडली.
यावेळी खेडी खु.चे सरपंच कैलास चौधरी, वडनगरी चे सरपंच भगवान पाटील, आव्हाणे येथील महिला सरपंच यांचे सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.