जळगाव जिल्हाब्रेकिंग

हतनूर धरणाचे ४१ पैकी ४ गेट पूर्ण तर ३२ गेट २ मीटरने उघडले : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा.

जळगाव, दि. ३१ : हतनूर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली असून तापी नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या धरणाच्या ४१ पैकी ४ गेट पूर्णपणे उघडण्यात आले असून ३२ गेट दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीपात्रात सध्या १,८५,८२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मात्र, परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील काही तासांत हतनूर धरणातून ३.५० लाख ते ३.७५ लाख क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन आणि जळगाव पाटबंधारे विभागाने तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना नदीपात्रात किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे