पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वृक्षाची गुढी
जळगांव (प्रतिनिधी)- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व नारी शक्ती व उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२२ मार्च२०२३ ठीक सकाळी११:०० वाजता विवेकानंद नगर श्रद्धा कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे व समाजसेविका मनीषा पाटील यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत हस्ते कडुलिंबाचे रोप लावण्यात आले.
“मानवाची पर्यावरणाशी असलेली बांधिलकीची रुढी “जोपासत “वृक्षाची गुढी ” उभारण्यात आली .वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वर आरवीती या उक्तीनुसार वनराई ही प्रत्येक सजीवाला जीवन आवश्यक प्राणवायु देते . गुढी ही परंपरा समाजात पुर्वीपासुन चालत आलेला आणी आजतागायत ती चालूच आहे . मांगल्याच्या प्रतीक असलेल्या गुढीला आपण कडुलिंबाचा पाला लावतो . कडूलिंबाचा पाला हा शीतलतेचे प्रतीक म्हणून येथे घेतला जातो. कडुलिंबाचा पाला हा शितलतेचा प्रतीक म्हणून गुढीला लावतो . मग जर शीतलतेच प्रतिक असलेला कडुलिंबाचे झाड गुढी म्हणून आपण या चैत्र पाडव्याच्या मंगल दिवशी प्रत्येक दारी उभारावी हया उदात्त निर्मळ आणि सुंदर विचाराने प्रेरीत होऊन आम्ही हा आजचा उपक्रम राबविला . या प्रसंगी सौ . मनिषा पाटील महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्षा, श्रीमती .ज्योती राणे , सौ .नूतन तासखेड़कर, सौ रेणुका हिंगू, किमया पाटील श्रीमती.निता वानखेडकर, वसंत पाटील,सौ .अर्चना पाटील ,मनीषा मंगेश पाटील, एम एम पाटील, म्हस्के ताई व तसेच सदरहू परिसरातील वृक्षप्रेमी याप्रसंगी उपस्थित होते .