जळगाव

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वृक्षाची गुढी

जळगांव (प्रतिनिधी)- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व नारी शक्ती व उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२२ मार्च२०२३ ठीक सकाळी११:०० वाजता विवेकानंद नगर श्रद्धा कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे व समाजसेविका मनीषा पाटील यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत हस्ते कडुलिंबाचे रोप लावण्यात आले.

“मानवाची पर्यावरणाशी असलेली बांधिलकीची रुढी “जोपासत “वृक्षाची गुढी ” उभारण्यात आली .वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वर  आरवीती या उक्तीनुसार वनराई ही प्रत्येक सजीवाला जीवन आवश्यक प्राणवायु देते . गुढी ही परंपरा समाजात पुर्वीपासुन चालत आलेला आणी आजतागायत ती चालूच आहे . मांगल्याच्या प्रतीक असलेल्या गुढीला आपण कडुलिंबाचा पाला लावतो . कडूलिंबाचा पाला हा शीतलतेचे प्रतीक म्हणून येथे घेतला जातो. कडुलिंबाचा पाला हा शितलतेचा प्रतीक म्हणून गुढीला लावतो . मग जर शीतलतेच प्रतिक असलेला कडुलिंबाचे झाड गुढी म्हणून आपण या चैत्र पाडव्याच्या मंगल दिवशी प्रत्येक दारी उभारावी हया उदात्त निर्मळ आणि सुंदर विचाराने प्रेरीत होऊन आम्ही हा आजचा उपक्रम राबविला . या प्रसंगी सौ . मनिषा पाटील महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्षा, श्रीमती .ज्योती राणे , सौ .नूतन तासखेड़कर, सौ रेणुका हिंगू, किमया पाटील श्रीमती.निता वानखेडकर, वसंत पाटील,सौ .अर्चना पाटील ,मनीषा मंगेश पाटील, एम एम पाटील, म्हस्के ताई व तसेच सदरहू परिसरातील वृक्षप्रेमी याप्रसंगी उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे