दिव्यांगांना ५ टक्के निधी व ५० टक्के मालमत्ता करातून सूट मिळण्याची मागणी : प्रहार अपंग क्रांती संस्थेचे निवेदन.
यावल :प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात येथील पंचायत समितीस निवेदन देण्यात आले. शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना ५ टक्के निधी वितरण व मालमत्ता करातून ५० टक्के सूट मिळावी व शासन निर्णयानुसार मंजुर सुविधा पुरवण्यात याव्या अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या असंख्य दिव्यांग बांधवांनी एकत्र येत प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पंचायत समितीमध्ये विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार दिव्यांगांना मालमत्ता करातून ५० टक्के सूट संदर्भात शासननिर्णय झाले आहे . तसेच शासन निर्णया नुसार तालुक्यातील दिव्यांग बांधवांना ५ टक्के निधी हा वितरण झाला पाहिजे . मालमत्ता करातून दिव्यांगांना ५० टक्के सूट मिळावी. अशा मागणीचा निवेदन संघटनेच्या वतीने दिले. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी , अपंग क्रांती संस्थेचे तालुकाध्यक्ष मोहनदास सोनार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आलिम शेख, गोकुळ कोळी, अभिमन्यू चौधरी, तुकाराम बारी, नितीन बारी, सचिन झाल्टे, राकेश भंगाळे, योगेश कोळी, नितीन सपकाळे, शेख रफिक शेख अल्लाउद्दीन, हेमचंद्र सुपडू चौधरी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगांच्या समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रसंगी देण्यात आला आहे.