रावेर

दमदार पावसामुळे तांदलवाडी-बलवाडी परिसरात “सुकी” नदीला पाणी

बलवाड़ी प्रतिनिधी:– आशीष चौधरी

सातपुड्यासह परिसरात सततच्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गारबर्डी धरण भरले असुन, ते ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहे. त्यामुळे तांदलवाडी बलवाडी दरम्यानच्या सुकी नदीला पाणी येऊन येथील पुलाखालून वाहत आहे. यामुळे वाघोदा,दसनूर, निंभोरा, बलवाडी, तांदलवाडी परिसरातील गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीला फायदा होतो. सुकी नदी वाहल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.सुकी नदीचे पात्र तसे वर्षभर कोरडे असते. ज्यावेळी सातपुड्यात दमदार पाऊस होतो त्यावेळेस गारबर्डी धरण ओव्हर फ्लो होते व सुकी नदीला पाणी येते. यावर्षी सातपुडा पर्वतात भरपुर पाऊस होत असुन, धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने नद्या वाहताना दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे