रावेर
दमदार पावसामुळे तांदलवाडी-बलवाडी परिसरात “सुकी” नदीला पाणी
बलवाड़ी प्रतिनिधी:– आशीष चौधरी
सातपुड्यासह परिसरात सततच्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गारबर्डी धरण भरले असुन, ते ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहे. त्यामुळे तांदलवाडी बलवाडी दरम्यानच्या सुकी नदीला पाणी येऊन येथील पुलाखालून वाहत आहे. यामुळे वाघोदा,दसनूर, निंभोरा, बलवाडी, तांदलवाडी परिसरातील गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीला फायदा होतो. सुकी नदी वाहल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.सुकी नदीचे पात्र तसे वर्षभर कोरडे असते. ज्यावेळी सातपुड्यात दमदार पाऊस होतो त्यावेळेस गारबर्डी धरण ओव्हर फ्लो होते व सुकी नदीला पाणी येते. यावर्षी सातपुडा पर्वतात भरपुर पाऊस होत असुन, धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने नद्या वाहताना दिसत आहे.