यावल

बैलजोडीस विजेच्या धक्का लागल्याने दुदैवी मृत्यु सहा शेतमजुराचे सुदैवाने जिव वाचले

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील कोळवद शिवारातील शेतात बैलगाडीला महावितरणच्या विद्युत तारांचा धक्का लागल्याने बैलजोडीचा दुदैवी मृत्यु झाला तर प्रसंगवधानाने सहा जणांचा जिववाचल्याची घटनासमोर आली आहे .या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , सुनिल अशोक चौधरी राहणार कोळवद तालुका यावल हे दिनांक ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास आपल्या कोळवद शिवारातील आपल्या शेतमजुर सहकार्यासोबत शेती कामास गेले असता ,दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतातील पेरणीचे काम आटोपल्यावर सुनिल अशोक चौधरी हे आपल्या मजुरांना सोबत बैलगाडीवर घरी येत असतांना रस्त्यावर महावितरणच्या शेतात लावलेल्या पोलच्या तणावास लावलेली चिनीप्लेट तुटल्याने विद्युत प्रवाह उतरून त्या ठिकाणाहुन जात असलेल्या बैलगाडीस विजेचा धक्का लागल्याने एक लाख रुपये किमतीच्या दोन बैलांचा दुदैवी मृत्यु झाला , सुदैवाने प्रसंगावधान लक्षात घेत दक्षता घेवुन धुरकऱ्यांने व बसलेल्या शेतमजुरांनी तात्काळ उडया घेतल्याने त्यांचा जिव वाचला . अशा दुदैवी घटनेत सुनिल चौधरी यांच्या बैलजोडीचा घटनेत दुदैवी मृत्यु झाल्याने संकट ओढवला असुन शासनाकडून मदतीची अपेक्षा ग्रामस्थ मंडळी कडून व्यक्त करण्यात येत आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे