यावल वन विभागातील अतिक्रमण काढले
यावल – येथील पुर्व वनविभागातील गारबर्डी सुकी धरण परिसरात राखीव वन खंडातील लाकडापासून बनविलेल्या 04 झोपड्या काढून नष्ट करित अनधिकृत,अवैध असलेले वन जमिनीवरील अतिक्रमीत आठ हेक्टर शेती क्षेत्रातील वनविभागाने मंगळवारी अतीक्रमण काढत त्यामध्ये खोल समतल चर खोदून वनजमिन अतिक्रमणमुक्त केले आहे. ही कारवाई धुळे (प्रादेशिक)वनवृत्तचे दिगंबर पगार , उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव जमीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
येथील पूर्व वनक्षेत्रातील गारबर्डी सुकी धरण परिसरात राखीव वनखंड क्रमांक 37 मध्ये असलेल्या लाकडापासून बनविलेल्या 04 झोपड्या तसेच अनधिकृत अवैध असलेले वन जमिनीवरील ८ हेक्टर अतिक्रमीत शेती , मधील अतिक्रमण काढून त्या वनात समतल चर खोदून आणि नष्ट करित वनजमिन अतिक्रमणमुक्त केले. दुसऱ्या राखीव वनखंवनखंडात शेती चे पट्टे मिळालेले असुन सुध्दा सदरच्या राखीव वनखंड मध्ये शेती आणि झोपड्या बांधून अतिक्रमण करत असल्याचे गस्ती दरम्यान आढळून आले.पुर्ण चौकशीअंती अवैध अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते. सातपुड्यातील वनक्षेत्रात असे अतिक्रमण आढळून आल्यास जिल्हाधिकारी जळगांव आणि उपवनसंरक्षक यावल यांचे आदेशानुसार तातडीने कारवाई करण्यात येईल जेणेकरून वन्यजीवांचे आश्रयस्थान मोकळे होत वनातील जैवविविधता जतन होईल.ही वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हडपे, , वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , वनपाल फैजपूर अतुल तायडे, रविंद्र तायडे आणि वनरक्षक सुपडू सपकाळे, युवराज मराठे, भैय्यासाहेब गायकवाड, गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, प्रकाश बारेला,.जिवन नागरगोजे, सतिष वाघमारे, गणेश चौधरी, चंद्रकांत बोरसे, वनमजुर बलदार तडवी आणि एस आर पी वनतुकडीचे जवान आदी वनअधिकारी, वनकर्मचारी सहभागी होते.